नागपूर
01-02-2025 21:18:48
Mission Maharashtra
शेतकरी, शेतमजूर, युवक यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प : रमेशचंद्र बंग माजी मंत्री
शेतकरी, शेतमजूर, युवक यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प : रमेशचंद्र बंग माजी मंत्री
नागपूर: ( दि. १फेब्रु. २०२५ ) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेला देशाचा अर्थसंकल्प हा शेतकरी शेतमजूर व युवकांची घोर निराशा करणारा आहे .
शेतकऱ्यांसाठी ठोस उपाय योजना नाही तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल यासाठी ठोस पावले उचलली नाही, उद्योग, शिक्षण, महिला यांच्यासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही. देशाच्या एकूण करा पैकी 38% कर एकटा महाराष्ट्र भरतो परंतु अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा साधा उल्लेख ही नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाची घोर निराशा करणारा आहे.




























































































































































































































































































































































































































